Friday, August 2, 2013

शासकीय प्रशासन २०१४ ची मते मिळवण्यासाठी झोपेच्या गुंगीत असल्याचे नाटक

कालची रस्त्यांवरची स्थिती पाहुन प्रशासना विषयीचा समज अजुनच दाट झाला.  शासकीय प्रशासन २०१४ ची मते मिळवण्यासाठी झोपेच्या गुंगीत असल्याचे नाटक करत आहे काय?

काल पुण्यामध्ये प्रत्येक रस्त्यावर स्व. अण्णाभाऊ साठे ह्यांच्या जयंती निमित्त मिरवणुका काढल्या होत्या. दिवसभर सगळीकडे traffic jam  करून जनतेला,  नोकरदार वर्गाला वेठीस धरले होते.

त्यांना अण्णाभाऊ साठे ह्यांच्या बद्दल थोडी तरी जाणीव होती का? त्यांच्या मिरवणुका कश्या?  तर item songs लावुन, विचित्र, वेडेवाकडे, दारू  पिउन  नाच चालू होते. आणि बाजुने सगळी वाहने, बसेस तिथुन निघण्याचा प्रयत्न करत होते. आम्हाला हे कळत नाही कि ह्यांना मिरवणुका काढायला परवानगी तरी कशी मिळते ? कि त्यांना येत्या गणेशोत्सवातील traffic jam ची झलक दाखवायची होती :(

भारतीय स्वातन्त्र लढ्यामधले थोर क्रांतिकारक लो . टिळक ह्यांची काल पुण्यतिथी होती. त्यांच्या बद्दल चे होर्डिंग मला  तरी कुठे दिसले नाही. (कुठे लावले असतील तर ती चांगलीच  गोष्ट आहे.) ह्या लोकांना त्यांची आठवण फक्त गणेश उत्सव साजरी करण्यासाठीच येणार… 

No comments:

Post a Comment